माझ्या निवडणुकीची गोष्ट .... माझ्या निवडणुकीची गोष्ट .... वयाच्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची खुमखुमी मला चक्क निवडणुकीच्या दहा - बारा दिवसाआधी आली . ना पारंपरिक राजकीय वारसा , ना ग्रामीण राजकारणाचा पुरेसा अभ्यास वा अनुभव किंवा मग गाव पातळीवर राजकीय उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी महत्वाचं मानलं जाते ते ' भावकी ' जाळे किंवा मग मतदारांना विकत घेण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा . यातलं काहीच हाताशी व मनाशी असण्याची शक्यता दूरवर नव्हती . होती फक्त उदंड इच्छाशक्ती आणि ग्रामविकासाची तळमळ . अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढविलेल्या माझ्या ग्रामपंचायत निवडणूक अनुभवाची ही गोष्ट ! २०२१ च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास चौदा हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडला . कोरोनामुळे कार्यकाळ संपूनही निवडणूक न झालेली असंख्य गावं आणि पारंपरिक नेते मंडळी चातकाप्रमाणे गावच्या पारावर अन चावडीवर बसून निवडणुकीची वाट पाहू लागले होते . यात सत्तेबाहेरचे लिंबू - टिंबू अधिकच व्याकूळ . हे चित्र बहुसंख्य गावांमध्ये पाहायला मिळत असतानाच रखडलेल्या गावांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला . निवडणूक यादीतल्या गावांना जिवंतपणा आला . गावातली सार्वजनिक बैठकीची ठिकाणे तरारून जागी झाली . चर्चा अपचर्चांना उधाण आले . निवडणुकीच्या तयारीची लगबग सुरू झाली . ग्रामपंचायत निवडणुकीचा आत्मा म्हणजे गावातील गट - तट . या गटातटाचे म्होरके आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार निवडीसाठी , एकगठ्ठा मतांच्या नियोजनासाठी , संभाव्य आरक्षण अन फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा करायला एकत्र जमू लागले . मग सुरू झाली रणधुमाळी . बहुसंख्य वाचकांना हे किंचीतही नवं वाटणारं नाही . गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्राशी जोडून असल्या कारणाने एकूणच सामाजिक जाणीवा थोड्याश्या घट्ट झाल्या होत्या . तीन वर्षापूर्वी गोपूज दुष्काळमुक्त करण्याच्या कार्यात बऱ्यापैकी गाव धुंडाळलं होतं . पाण्याइतकेच किंवा त्याहीपेक्षा गहन व ज्वलंत गावातले प्रश्न जवळून पाहिले होते . पाण्याचा दुष्काळ ते शेती , जनावरं आणि माणसांची परवड हे कनेक्शन कमी वयात पाहिलं आणि जगलोही होतो . थोडं समाजभान येऊ लागलेल्या अगतिकतेच्या टप्प्यात राजकीय भूमिकेचे महत्वही प्रकर्षाने जाणवले होते . याच जाणिवेने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यक्षम उमेदवारांना प्रत्यक्ष सोबत उतरून बळ देण्याचा निर्धार मी आणि माझ्या समविचारी साथीदारांनी केला होता . मात्र प्रत्यक्ष गावातील राजकीय वातावरणाचा , उमेदवारांचा , गटा तटांचा अंदाज घेतल्यानंतर मनात खूपच घालमेल सुरू झाली . निवडणुकीची पद्धती खूपच अलबेल दिसत होती . विश्वासू , अभ्यासू अन कार्यक्षम नेतृत्व दिसत नव्हते . भावना विवंश होऊन मी , अतुल , सूर्यभान आणि इतर साथीदार सतत यावर बोलत होतो . हे चित्र बदलायला हवं या निष्कर्षापर्यंत येत होतो . आपल्याला बरं - वाईट कळत असताना समोर चुकीचं घडतंय हे दिसत असताना आपण गप्प कसे बसू शकतो ? या प्रश्नाने आम्ही खडबडून जागे झालो . मग ठरलं बदलाची सुरुवात स्वतःपासून . आपण निवडणूक लढवायची , लोकांच्या समोर जायचं , त्यांना सक्षम , अभ्यासू , कार्यक्षम नेतृत्वाची गरज पटवून द्यायची . आणि आमचं ठरलं . निवडणूक स्वाभिमानाने लढवायची , वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक , भावकी , जात , धर्म , लिंग , देव आणि व्यक्ती केंद्रित निवडणूक पध्दतीला छेद देत संविधानिक , मूल्याधिष्ठित , विकासानुरूप निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्धार केला . निवडणुकीचा अर्ज स्वतःच ऑनलाईन पद्धतीने भरला . त्यानंतर मात्र गावात खळबळ सुरू झाली . एकीकडे गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अट्टाहास बाळगून बसलेले पारंपरिक नेते , अर्थातच त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेलाच . तर दुसरीकडे पॅनल उभा करण्यासाठी ज्या उमेदवाराची भावकी अधिक असेल , पैसा खर्च करण्याची तयारी असेल अशा उमेदवारांच्या ? शोधात गावभर कसरत करणारे पारंपरिक लिंबू - टिंबू . अशातच आमचा निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांना सुखावणारा नव्हता . मग " निवडणूक लढविणे शेंबड्या पोरांचं काम नव्हे , एवढे लाख तयार ठेवा , गुमान माघार घ्या , तुमची बघितली तर चार घरं अशा हिनावण्या आणि धमक्या देऊन झाल्या . तरीही पोरं हटतनाहीत म्हटल्यावर " एवढे तेवढे पैसे घ्या , कुणीतरी एकाने आमच्या पॅनलमध्ये या " अशा विनावण्याही झाल्या . या परिस्थितीत आमचा स्वतःवरचा विश्वास अधिकच दृढ होत गेला . • जिवलग मित्र अतुल आणि मी दोघांनी निवडणूक अर्ज कायम ठेवला . सामाजिक कार्यकर्ते म्हणून गावात असलेली थोडीफार मान्यता राजकीय नेतृत्वाच्या साच्यात परावर्तित करणे ही एक कसोटीच होती . ते आव्हान • आम्ही ' अपक्षपणे स्वीकारले . ' स्वाभिमानी ग्रामपरिवर्तन ' नावाने दोघांचंच पॅनल उभं राहिलं . नारळ न फोडता नारळाचे रोप लावून प्रचाराचा नारळ जपण्याचा वाढवण्याचा पर्यावरणवादी कार्यक्रम घेऊन प्रचाराला सुरुवात केली . एकीकडे घरातीलच आठ - दहा सदस्य सोबत घेऊन आमच्या प्रचाराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर दुसरीकडे इतर पॅनलमधील उमेदवार अन पॅनलवाले शेकडोंची गर्दी जमवून प्रचार आरंभाची रॅली गावभर मिरवून शक्ती प्रदर्शन करत होते . आम्ही ठाम होतो . भलेही आज आठ - दहा लोक सोबत असतील पण माणूस बदलतो , आपण माणूसपणावरचा , विवेकावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही , ही रोज मनाची समजूत घालत होतो . मग ग्रामविकासाचा जाहीरनामा मांडला . जलसंधारण , आरोग्य , शेती , शिक्षण हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी • अत्यंत बारकाईने व सखोल योजना आखल्या . गावच्या विकासाचे भविष्य जाहिरनाम्याच्या रूपाने कागदावर उतरवले आणि जनतेच्या मनामनातही . लोकांना आमच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधता यावा म्हणून त्यांच्या उमेदवारांचे शिक्षण , सामाजिक आणि चळवळींच्या कार्यातील योगदान , राज्य - राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व आणि • अनुभव इत्यादी दाखले गावकऱ्यांसमोर मांडले . " तुमच्या उमेदवारांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवा आम्ही तो सार्थ ठरवू " अशी भावनिक सादही घातली . जाहीरनामा घेऊन किमान बारा ते पंधरा वेळा वार्डातील मतदारांना भेटलो . वडील मंडप व स्पिकर व्यावसायिक असल्याने अगदी लहानपणीच कामानिमित्ताने माईक हातात पडला . गावात कुठेही लग्न , बारसे किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला की संपूर्ण गावाला माईकवर निमंत्रण देण्याचे काम करत आलो होतो . आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला जाहीर करायला माईक हाती घेतला . मीच माझा कार्यकर्ता होतो , इतर उमेदवारांसारखी कार्यकर्त्यांची रेलचेल सोबतीला नव्हती . मग प्रचाराच्या गाडीवर बॅनर बांधायचा , प्रचाराची गाडी चालवायची , कोपरा बैठकीसाठी स्पिकर लावायचा आणि त्याच बैठकीत माझा जाहीरनामाही मीच मांडायचा , कार्यक्रम झाला की सगळं गुंडाळायचंही मीच . हा अनुभव मला समृद्ध करणारा होता . माझा मतदारवॉर्ड तसा लांबलचक विस्तारलेला . गावच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत . गावाच्या बहुतेक वाड्या - वस्त्या माझ्याच वॉर्डमध्ये असल्याने प्रचारासाठी भरपूर पायपीट करावी लागली . शेताच्या बांधापासून ते घरातल्या चुलीपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याला जीव तोडून सांगत होतो . अनेकांनी कौतुक केलं , मत देण्याचं आश्वासन दिलं तर काहींनी राजकारणात न उतरण्याचा सल्लाही . प्रचारादरम्यान जुन्या प्रतिनिधींच्या निष्क्रीयतेची पावलोपावली प्रचिती येत होती . कुणाला गॅस हवा होता , कुणाला घरकुल , कुणाला गोठा , कुणाला अडकलेले अनुदान , रस्ता , शुद्ध पाणी , हातपंप , मागासवर्गीय निधी , शेततळे , शेतापर्यंतचा रस्ता , आदी असंख्य प्रश्न समोर आल्यावर अक्षरशः गांगारून गेलो . इतकी वर्षे हे प्रश्न का सुटले नाहीत हाच विचार सतत मनाला छळत होता . गावातील म्होरक्यांच्या धाकाने , संबंध खराब होतील या भीतीने नागरिक सोबत यायला कचरायचे . या कठीण काळात माझे आई - वडील खंबीरपणे सोबत उभे राहिले . नितीन जाधव , शुभम गुरव , क्षितिजा देशमुख , अक्षता पानकर , आश्विनी पवार , ऋषिकेश पवार , अक्षय शिंदे यांसारखे TISS , APU , TDA आदी नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे मित्र - मैत्रिणी मतदारांना शहाणे करण्यासाठी घरोघरी फिरले . या समाजभानी लोकांच्या असण्याने निवडणूक पद्धतीला नैतिक महत्व प्राप्त झाले . गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सभेचे आयोजन आम्ही केले . सभेमध्ये पोटतिडकीने जाहीरनामा लोकांसमोर मांडला . जलसंधारणाशिवायचा विकास आराखडा जाहीर केला . ज्यात महिला आरोग्य , स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्ये , शिक्षण , पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त गावकारभार , जलसिंचनाचे महत्व व अनुदान , बंधारे दुरुस्ती , विद्यार्थ्यांना फ्री वाय - फाय , घरपोच कागदोपत्री सेवा , वित्त आयोग , आदी कृती आराखडा सांगितला . विरोधी उमेदवारांची निवडणूक लढविण्याची पध्दती मात्र अनैतिक होती . मताला एक ते पाच हजारांचा ( मतदारांची भुरळ क्षमता पाहून ) दर , निवडणूक होईपर्यंत ठरलेल्या धाब्यावर दारू अड्डयावर कार्यकर्ते अन मतदारांचा पाहुणचार , भावकी , जात , धर्म , आळी - गल्ली , आडनाव या अविवेकी मुद्यांच्या आधारे मतदारांनानिवडणूक कशी त्यांच्या प्रतिष्ठेची आहे हे रुजवणे , दुबळ्या नागरिकांना धमकावून , देवभोळेपणाचा फायदा घेऊन अमुक - तमुक देवांच्या शपथा घालून किंवा गुलाल - भंडारा उचलून पैसे देणे अन मतदारांना मतं द्यायला भाग पाडणं . यातून जिंकण्या - हरण्या पलीकडे संविधानिक व नैतिक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक पार पडावी यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली . महिलांसाठी राखीव आरक्षण नावाचा प्रकार जरी अस्तित्वात असला , तरी ' तिच्या ' प्रचारासाठी ' तिला ' बाहेर न पडू देणारी , तिला नामधारी पदप्रतिष्ठा देऊन नवरा , मुलगा , सासरा यांच्या ढुंगणाला आजवर चिकटलेली खुर्ची तिला आता मिळायला हवी . सोबत निर्णयस्वातंत्र्यही . जातीनिहाय वस्त्यांचे , वंचितांचे प्रश्न मला या निवडणुकीने कान धरून दाखवले . शेवटी ' माझ्या ' निवडणुकीचा निकाल लागला . मला चक्क १५६ मतं मिळाली होती . याचा अर्थ प्रत्यक्ष सोबत येऊ न शकलेल्या १५६ महिला , वृद्ध , तरुण - तरुणी अन गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता . अवघ्या ३६ मतांनी जरी मला निवडणूक प्रक्रियेत जिंकता आलं नाही तरीही गावकऱ्यांच्या मनात माझा , माझ्या साथीदारांचा , संविधानिक निवडणूक पद्धतीचा विजय झाला . यातून एक समजलं गावाकडच्या चुरगळलेल्या माणसांना शाश्वत उभं करायला आता खरोखरच कार्यक्षम अन अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे . राजकारण हे घाणेरड्या अन नालायक लोकांचं क्षेत्र कधीच नव्हतं , नाही आणि नसेल . सूज्ञ नागरिकांच्या नेतृत्वाच्या अभावाने ते तसं बनलं आहे . गावाकडच्या साध्या - भोळ्या लोकांना आता बदल हवाय . मला या बदलाचा भाग व्हायचंय तुमच्या सोबतीने आमूलाग्र बदल घडू शकतो ... म्हणून लढूयात !! आणि जिंकूयात !! ~ सत्यजित सीमा सं ( 9561629202 )
Hello Connections, I am excited to share with you my recent experience of interviewing Mr. Dattaprasad Kadam, President of Village Pavarwadi District-Satara, as part of the TOP INDIA TALKS initiative. During the interview, Mr. Kadam shared his inspiring journey from a government school student to an engineer and after that to the President of Village . with this he also shared his vision for rural development. Here are some of the important points from our conversation: 1) Upon becoming the village president, Mr. Kadam noticed that many female ward members and other women in the village had discontinued their education due to various reasons. To address this, he initiated a program to complete their studies through open universities sponsored by the Gram Panchayat. 2) Mr. Kadam has also taken impressive steps towards child-friendly governance. He regularly conducts Bal Sabhas (assembly/meeting of children) in his village to understand the needs of children and involve them in the vill